Eka Premachi Gosht

त्या दोघांचा ब्रेकअप झाला होता...
त्याला नोकरी लागायला वेळ होती अजुन...
पण ती थांबायला तयार नव्हती....
शेवटी गेली ती त्याला सोडून....
आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा.....
प्रेम...विश्वास...भावना... यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा....त्या गोष्टीला ३ वर्ष झाली...पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला....घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे...
पण हा नेहमी टाळाटाल करायचा....
पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्यांना बोलावते...
.तो येतो ऑफीस मधून..सगळे बसलेलेच असतात....सगळे समोर असल्यामुळे तो टाळाटाल न करता गप बसतो....
मुलीकडे पाहायची तर ईच्छा नसते...
पण घरचे सगळे खुपच आग्रह करतात....बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रहा करतात...
दुसर्या दिवशी भेटणाचा ठरत...
त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्यायचा हाच विचार तो रात्र भर करत असतो....
दुसर्‍या दिवशी ते भेटतात...
संध्याकाळचे ४ वाजले असतात....
तेवढयत त्याला ऑफीस मधून फोन येतो...
तसा ही त्याला तिला नकार द्यायचा असतो बोलायची पण ईच्छा नसते...
म्हणून तो तिला बोलतो...
"मला ऑफीस मध्ये जरा थोडा वेळ काम आहे तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का? "
ती बोलते "ठीक आहे"
दोघेही टॅक्सीत बसतात..
पूर्ण वेळ शांतच....
कोणीच काहीच बोलत नाही....
ऑफीस येत....ते बिल्डिंग पाशी येतात...
तो तिला म्हणतो वर चल...
पण ती म्हणते उगीच ऑफीस मधले गैर समज करतील मी थांबते खाली तू ये जाऊन..."
आणि तो जातो....
तो ऑफीस मधे जातो...
काम करत असतो....त्याचे साहेब त्याला
बोलावतात...आणि त्याला प्रमोशन चा
लेटर देतात... आणि बाहेर देशात जाणायची संधी पण असते.....तो खूपच खुश होतो...
पण त्याचे साहेब बोलतात...की तुला आताच्या आता मला एक प्रेज़ेंटेशन तयार करून द्यावा लागेल....मला लवकरात लवकर त्याना सेंड करायचा आह.े..तो तयार होतो...
आणि लागतो कामाला....ती खाली वाट बघत आहे हे विसरुनच जातो तो....
६वाजतात...नंतर ७...८...८.३०....
फाइनली त्याचा प्रेज़ेंटेशन तयार होत...तो जातो साहेबाना द्यायला...ते पण खुश होतात....साहेब"जा आता घरी जा आणि घरच्यांना पण आनंदाची बातमी दे....
ते ही वाट बघत असतील ना...."
त्याला अचानक आठवत...तो तिला खालीच सोडून आला होता...आणि या प्रेज़ेंटेशन मुळे विसरूनच गेला होता....ती गेली असेल निघून असाही त्याला वाटत पण जर थांबली असेल तर...तो लगेच निघतो तिथून..मन खूपच अस्वस्थ असतो त्याचा...
तो गेट बाहेर येतो...
पाहतो तर काय...ती असते एका आडोशयाला उभी....त्याला काय बोलाव ते सुचतच नाही
तो"सॉरी ग...मी विसरुनच गेलो होतो...मला वाटला तू गेली असशिल...
तू गेली का नाहीस???
मला फोन तर करायचा ना....."
ती "अरे तूच तर बोलला की थोडा वेळ काम आहे म्हणून....मला वाटला येशील लगेच..आणि फोन करायला..तुझा नंबर आहे का माज्या कडे...मनात आला तुझ्या घरी तुझ्या बाबांना विचारावा नंबर..पण मग ते तुलाच ओरडले असते नंतर...आणि माझ्या घरच्यांना विचारल असत तर त्यांचा पण तुझ्याविषयी गैर समज झाला असता...वरती जावा वाटल पण परत ऑफीस मध्ये तुला डिस्टर्ब होइल म्हणून नाही आले....
आणि तू बोलला होतास ना येतो...मग ....?"
तिला काय बोलावा हेच समजत नाही त्याला....पण तीच मन आवडतो त्याला...
तो "मला आवडली तू."
ती"अरे पण अस आचनक...
आपण अजुन काही बोललो पण नाही...तू ओळखतही नाही मला अजुन नीट...
लगेच अस ठरवायचा कारण????"
तो"हो....कारण आहे....पण मला एक सांगायचा आहे तुला.....मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो...ती ही करत होती....
पण लग्नासाठी ती तयार नव्हती...तिला माझ्या प्रेमा सोबत माझे पैसे ...नाव...प्रसिद्धी..हेही हव होत..पण तेव्हा माझ्या कडे काहीच नव्हता...मी तिला थोडा वेळ मागितला...पण तोही ती द्यायला तयार नव्हती...शेवटी गेली ती सोडून मला....त्यानंतर माझा प्रेम आणि विश्वास सर्व निरार्थक वाटू लागला....म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाल करायचो...तुलाही नकार द्याचा हेच ठरवला होता मी...खूप आधीच...पण आज जे झाला...त्याने माझे डोळे उघडले...जिच्यावर मी इतका प्रेम करत होतो...ती ने मला कधी वेळ दिलाच नाही...आणि आज माज्या फक्त एका शब्दावर....तू एतका वेळ थांबलिस...आणि मी विसरलो होतो हे एइकूण सुधा तू मला समजून घेतलास एतका....कदाचित प्रेम होण्याला अजुन वेळ असेल आपल्यात....पण मला तुझा स्वभावच आवडला....ते पुरेस आहे आपल्या संसारसाठी....हो ना...."
"जर तुलाही मी आवडलो असेल तर....सांग??"
ती हळूच नजर खाली घेते..त्याला तिचा उत्तर समजत....तो आई ला फोन करतो....आणि बोलतो..."मला मुलगी पसंत आहे"
मित्राणो..लग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेच असतच...पण त्यापेक्ष्याही...एकमेकना समजून घेण गरजेच असत....
ते म्हणतात ना...
"कभी तो पेहली मुलकात ही काफ़ि होती है .प्यार के लिये .. और कभी बहूत सी मुलकातें लग जाती है"